Home » Blog, इतर » सरहद को प्रणाम!

सरहद को प्रणाम!

प्रशांत देशपांडे

सरहद को प्रणाम हा कार्यक्रम देशाच्या आजच्या नवीन  पीढीला देशाची  भूसीमा किती आहे, तेथील भागात राहणार्‍यांचे जीवन. परिवारासोबत परिचय व्हावा तेथील पर्यावरण व सामाजिक परिस्थितीचा अभ्यास करावा आपल्या ज्ञानात भर पडावी ‘देश रक्षा धर्म हमारा देश रक्षा कर्म हमारा’ हा मंत्र जपत आपण एक चांगले नागरिक आहोत या नात्याने सीमावासीयांच्या समस्या, जीवनमान समोर याव्यात या समस्यांचे निराकरण व्हावे, असा प्रयत्न करावयाचा हा उद्देश ‘सरहद को प्रणाम’ या कार्यक्रमाचा आहे.

‘सरहद को प्रणाम’ २०१२ राष्ट्र जागरणाचा हा आगळा वेगळा कार्यक्रम. यात देशातील भूदलीय सीमा एकूण १५१०६.७ किमी आहे. या ठिकाणी देशातील प्रत्येक जिल्ह्यातील एक युवकांचे गट तयार करून १९ ते २३ नोव्हेंबर २०१२ या कालावधीत सीमेवरती जाऊन सैनिक व तेथील स्थानिक प्रशासन नागरिकांशी संवाद साधला हा कार्यक्रम फोरम फॉर इंटिग्रेटेड नॅशनल सिक्युरिटी  (ऋखछड) या संस्थेने आयोजित केला याद्वारे सीमावरती भागातील जंगली प्रदेश वाळवंट काही ठिकाणी बर्फ तर काही ठिकाणी दुथडी भरून वाहणार्‍या नद्या याचा अनुभव घेतला. विविधतेने नटलेल्या भूभागातील पशू, पक्षी, जलचर, प्राणी यांच्या प्रजाती समजवून घेणे. सीमेवरील नागरिकांशी चर्चा करणे, तेथील रस्ते, वीज, पाणी आदी गोष्टींचा अभ्यास सीमेवरती कर्त्यव्य बजावत असणार्‍या सैनिकांचा अनुभव जाणून घेणे ‘कमी बोलणे, जास्त ऐकणे व समजवून घेणे’  अशा पद्धतीने सीमावरती भागातील नागरिक व सैनिक यांच्याशी संवाद साधणे हा उद्देश होता. आपल्या मातृभूमीची सीमा पाहण्याचा आगळावेगळा अनुभव घेऊन घरी परतले. हा अनुभव अविस्मरणीय असा आहे.
देशाची एक इंच जमिनीचा तुकडा न पडता आणि देशाची अखंडता कायम राखावी यासाठी सरकारला सावधान करणे हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून युवक सहभागी झाले होते. देशामध्ये चारही बाजूंनी वाढत राहणारी घुसखोरी, आंतकवाद, नक्षलवादी आणि शास्त्रांची होणारी तस्करी या वर बंदी घालावी. सरकार आणि स्थानिक प्रशासन यांच्या माध्यमातून ग्राम सुरक्षा समिती स्थापन करावी व त्यांना प्रशिक्षण द्यावे आणि तेथील लष्कर आणि पोलीस यांना आधुनिक शस्त्रे आणि प्रशिक्षण द्यावे हा मुख्य उद्देश.
या कार्यक्रमासाठी सोलापुरातून युवराज माळगे, अहमद शेख, संतोष तोनशाळ, भालचंद्र शेेजवलकर, विश्‍वनाथ बागलकोटी, समर्थ बंडे आणि मी प्रशांत देशपांडे असे ७ युवक सहभागी झालो होतो. येथून पुणे मार्गे कलकत्ता ते न्यू अलीफरद्वारला १९ नोव्हेंबर २०१२ सकाळी पोहचलो तेथे केरळ, पंजाब, महाराष्ट्र, उत्तरबंग, कोलकत्ता येथून मोठ्या संख्येने युवक सहभागी झाले. तेथे ६० जणांचेप्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. १९ व २० नोव्हेंबर २०१२ दोन दिवस शिबीर झाले. त्यानंतर १८,१८, १८ चे ३ गट करण्यात आले. ३ वेगवेगळ्या ठिकाणी कुमारग्राम, बीरपाडा, जयगाव या ठिकाणी हे गट रवाना झाले. तेथूनच खर्‍या अर्थाने खर्‍या कार्यक्रमास सुरुवात झाली. २० नोव्हेंबर २०१२ सुरुवात झाली. घराघरात दुकानात, वाडी, वस्ती वरती जाऊन सोबत तिरंगा व तेथील नागरिकांना रक्षा सूत्र बांधून तेथील समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न केला. भारत आणि भूतान सीमेवरती जाऊन आम्ही भारताच्या सीमेवर असलेल्या मातीस व दगडावर सोलापूर जिल्ह्यातून पंढरपूर येथून चंद्रभागा नदीतील पाण्याचा अभिषेक केला. पहिल्या दिवशी २५ किमी. अंतर पार करून संध्याकाळी बीरपीडा येथे पोहोचलो. २२ नोव्हेंबर २०१२ बीरपाडा ते मलकापाडा तेथून भूतान चौकीपर्यंत १७ किमी चालत जात नागरिकांशी संवाद साधला. तेथे असलेल्या त्रुटींचा फायदा घेऊन धर्मांतर करावयाचा इतर देशांचा प्रयत्न सुरू आहे, असे तेथील अनेक नागरिकांनी सांगितले. आणि भूतान देश महिन्याला १०० मीटर भारताच्या दिशेने सरकत आहे असे तीन महिन्यांत ३०० मीटर पुढे सरकत असताना तेथील एक कालीमातेचे मंदिर हस्तगत केले. गेल्या महिन्यात तेथे सीमा दर्शविणारा पोल नव्हता पण या महिन्यात पोल होता. शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना ३ ते ४  किलोमीटर चालत जावे लागते. किंवा खाजगी बस ट्रक यांच्यातून प्रवास करावा लागतो. तेथील लष्कर जे आहे ते भूतान मधील नागरिकांच्या सुरक्षेसाठी आहे, असे तेथील नागरिकांनी आर्वजून सांगितले. भूतान सरकारकडून सीमावर्ती नागरिकांना पाणी विकत घ्यावे लागते. ज्यास पैसे मोजून अल्प पाणी भूतान सरकारकडून मिळते. तेथे आमच्या १०० युवक, युवतींची मानवी साखळी तयार करण्यात आली. याचा आमच्या शहरात, जिल्ह्यात, गावात, वाडीवस्तीवर अनुभव कथन करणार आहोत.
एकूण सीमा – २२,६२३,३० घच
एकूण सागरी सीमा – ७५१६.६ घच
एकूण भूदलीय सीमा- १५,१०६,७० घच
एकूण सीमा
भूतान ६६९ घच
मानयम्यार १,६४३ घच
नेपाळ १,७५१ घच
अफगाणिस्तान १०६ घच
पाकिस्तान ३,३२३ घच
तिबेट ३,४८८ घच
बांगलादेश ४,०९६.७० घच
आम्ही सर्वजण वेगवेगळ्या ठिकाणी गेलो तेथे पाऊस असतो. वर्षातून आठ महिने पाऊस असतो, पण तेथील नद्यांना पाणीच नसते. फक्त पावसाळ्यातच पाणी असते. पावसाळ्यात इतके पाणी असते की, अलीकडील गावाचा आणि पलीकडील गावाचा संपर्क तुटतो. जर व्यापार व्यवहार किंवा इतर कोणत्याही गोष्टीचे काम ठप्प होते. आता हिवाळा सुरू आहे. म्हणून तेथील सर्व नद्या कोरड्या ठणठणीत असतात. तेथे हिमालय असल्यामुळे त्या डोंगराभोवती खूप दाटीवाटीने झाडी, झुडपे आहेत. त्यामुळे थंडीचे प्रमाण खूप असते. या पेक्षाही जानेवारी महिन्यात थंडीचे प्रमाण वाढते. प्रशासनाकडे ‘पावसाळ्यात’ पाणी वाचवा पाणी अडवा’ हा उपक्रम आहे, पण अमलात अजूनही आणला गेला नाही. तेथील नागरिकांना सांगितले पाणी आणायाला १० ते ३० किलोमीटर चालत जाऊन पाणी आणावे लागते. मी जेव्हा तेथील एका गृहस्थाला विचारले, ‘तुम्ही पिण्याचे पाणी कोठून आणता?’ तो म्हणाला, ‘कधी कधी १० ते ३० किमी चालत किंवा सायकलवर जाऊन पाणी आणावे लागते.’ आणि कधीतर भूतान सरकारकडून  पाणी आणावे लागते तेही महिन्याकाठी एक हजार ते सतराशे रु. मोबदला देऊन पाणी आणावे लागते. तेथील एका माणसाने सांगितले की, तेही आता पाणी देण्याचे बंद करणार असल्याचे सांगितले. तेथील मुख्य व्यवसाय शेती आहे. तेथे जास्त प्रमाणात चहाचे मळे जास्त आहेत. पण पाण्याची व जंगली हत्तींची व हिंस्त्र प्राण्याची संख्या जास्त असल्याने पुढील काही काळात चहाचे मळे नष्ट होण्याची भीती वाटते. भूतानच्या सीमेवरील तेथील सरकार सिमेंटचा कारखाना उभा करणार असल्याने तेथे धुळीचे साम्रज्य असल्याने चहाच्या पिकाचे अस्तित्व धोक्यात आले आहे, असे तेथील नागरिकांनी सांगितले. ज्या ठिकाणी भूतानची चौकी आहे, त्या भागातील जवळपास ५ ते ६ किमी भाग जो भारतात येतो तेथे चहाचे मळे होते, पण भूतान सरकारने जबरदस्तीने काढण्यास सांगितले, पण  ते न काढल्याने त्यांनी स्वत: काढून टाकले. तेथे  जंगल जास्त असल्याने व पहाडी क्षेत्र असल्याने जळाऊ लाकूड किंवा घर बांधण्यासाठी लागणारे वासे यांची आयत निर्यात केली जाते. तेथे जास्त करून सिमेंटचे मोठमोठे दगड मिळतात मोठमोठ्या नद्या असल्याने व वर्षातून ३ ते ४ महिने नदी कोरडी असल्याने वाळू उपसाचे प्रमाण जास्त आहे. तेथे पशुपालन जास्त प्रमाणात करतात. कारण तेथे त्यांना खायला व त्यांचे पालनपोषण करण्यास चांगले वातावरण व परिस्थिती आहे आणि तेथील सर्व प्राणी देशी आहेत.  तेथील लोक गाय, म्हैस, शेळी, मेंढी इत्यादी प्राणी पाळतात. जंगली हत्तीचे प्रमाण जास्त असल्याने तेथील शेतीचे व इतर प्राण्यांचे अस्तित्व धोक्यात आले आहे. आम्ही जेथे गेलो तेथील एक शिक्षक भेटले. त्यांना विचारले इथे शाळा कुठे आहे, तर त्यांनी असे उत्तर दिले की, चार गाव मिळून एक शाळा आहे आणि तेथे छोटी छोटी गाव बरीच आहेत. शाळेत विद्यार्थी येतात, पण शिक्षकांची कमतरता आहे. मग आम्ही तेथील एका शाळेस भेट दिली तेथील शिक्षकांनी सांगितले १५० विद्यार्थ्यांसाठी ३ शिक्षक आहेत. सीमावर्ती भागात घुरवा आणि आदिवासी जमात राहत असल्यामुळे यांची मातृभाषा हिंदी आहे, पण शैक्षणिक अभ्यासक्रम बंगाली आणि इंग्रजी माध्यमातून शिकवले जात असल्याने त्यांना समजण्यास कठीण जात आहे. तेथे हिंदी माध्यमातील शिक्षकांची कमतरता भासत आहे.
वर्षातून सहा महिने पाऊस पडत असल्याने शाळा बंद असतात. शाळा दूर असल्याने जाण्यासाठी व घरी परतण्यासाठी सरकारी व खाजगी व शाळेची बसची व्यवस्था नाही. त्यामुळे मिळेल त्या वाहनातून प्रवास करावा लागतो असे तेथील पालकांनी सांगितले. फक्त आठवीपर्यंत शिकण्याची सोय असल्याने पुढचे शिक्षण घेण्यासाठी एखादे शहर किंवा तालुकालेवलच गाव शोधावे लागते आणि तेथे जाऊन शिक्षण घ्यावे लागते. तेथे  काही ठिकाणी रुग्णालय आहेत, पण डॉक्टर कधी येतात व जातात ते त्यांनाच माहिती आहे. काही ठिकाणी दवाखानेच नाहीच. सरकारी दवाखाने आहेत, पण डॉक्टर नाही. बिजली आहे, तीही काही निवडक घरामध्येच. तेथील राजकीय पुढार्‍यांना जे पाठिंबा देतात त्यांच्याच घरात लाईट आहे. तेथील रस्त्यांची स्थिती इतकी खराब आहे की खड्ड्यात रस्ता आहे का रस्त्यात खड्डा आहे ते कळतच नाही. तेथील पाणी प्यायला चांगले आहे. पण पाण्याची कमतरता असल्याने पाणी जपून वापरावे लागते. तेथील पिण्याच्या पाण्याचे माध्यम विहीर, बोर, हपसा आहे. सरकारी हपसा आहे, पण मशनरी बसवली नाही. पाण्यासाठीही वणवण हिंडावे लागते. रोजगाराचे साधन आहे, पण मोबदला कमी मिळतो. एका मजदुराने  सांगितले आम्ही दोघे दिवसभर काम केल्यावर तेव्हाकुठे शंभर रुपये मिळतात तेच भूतानमध्ये रोजगारासाठी जावे लागते तेथेही भेदभाव सहन करावा लागतो. सामाजिकता तेथे जपतात. एकत्र येऊन कार्यक्रम करतात तेथील लोकांचा बाहेरच्या जगाशी संपर्कच नाही. आम्ही गोलो तर ते लोक घाबरून घरात जात होते. सुरक्षेचा प्रश्‍न तर फार मोठा आहे. भारत कुठे सुरू होतो आणि भूतान कुठे सुरुवात होते तेच कळत नाही.
माझ्या मित्रांनी सांगितले त्यांची जेथे भोजनाची व्यवस्था केली आहे ते हॉटेल भारतात आहे आणि तेथील पायर्‍या भूतानमध्ये आहेत. तेथील साधू आपल्या भारतात येऊ शकतात, पण आपले भगवे वस्त्र परिधान केलेले साधू लोक तेथे जाऊ शकत नाहीत. तेथे एक कालीमातेचे मंदिर आहे. भूतान सरकारने आपल्या ताब्यात घेऊन तेथील साधूला हाकलले व परत न्याय मिळवायला गेल्यास मारून पाठवले. महिन्याला शंभर मीटर पुढे सरकत असल्याचे आम्ही स्वतः तीन पोल पाहिले. आमच्या व्यवस्थाप्रमुखांचे नाव अलोक रॉय होते. त्यांनी सांगितले, ‘मी महिन्याअगोदर आलो होतो, तर पोल नव्हता, पण आम्ही गेल्यावर पोल होता तेथे कोणत्याही प्रकारचे कुंपण नाही. तेथील महत्त्वाचे पदार्थ भात,  डाळ, मांसाहार आणि सब्जी.
रविवार, दि. ०९ डिसेंबर २०१२

Posted by : | on : 25 Dec 2012
Filed under : Blog, इतर
Author Description : I am Amar Puranik from Solapur. I am a Journalist and Webdeveloper..
You can follow any responses to this entry through the RSS 2.0
You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *