Author : Amar Puraniktweet
•चौफेर : अमर पुराणिक• राष्ट्रीय राजकारणाच्या दृष्टीने किंवा केंद्राच्या दृष्टीने युतीच्या समिकरणाची वेगळी कारणे आहेत तर राज्यांच्या राजकारणाच्या दृष्टीने वेगळी आहेत. केरळमध्ये माकपाच्या नेतृत्वातील एलडीएफ आणि कॉंग्रेसच्या नेतृत्वातील युडीएफ यांच्यात धृ्रवीकरण कायम आहे. या दोन्हीही युत्या केंद्रात सत्तेत असलेल्या रालोआचे विरोधक आहेत. तर या उलट तामिळनाडुत प्रमुख दोन पक्ष अण्णा द्रमुक आणि द्रमुक हे आहेत. या दोन्ही पक्षांचे केंद्रातील रालोआ सरकारशी वैरही नाही किंवा मैत्रीही नाही असे संबंध आहेत. पश्चिम बंगालमध्ये तृणमूल कॉंग्रेस आणि डावी आघाडी यांच्यात लढत...3 April 2016 / No Comment / Read More »
Author : Amar Puraniktweet
•चौफेर : अमर पुराणिक• कम्यूनिस्ट आणि कॉंग्रेस देशभक्ती आणि देशद्रोह यातील सीमा रेषा पुसट करण्याचा उद्योग करत आहेत. केवळ पुसट करण्याचाच नव्हे तर पुर्णपणे पुसुन टाकण्याचा एक कलमी कार्यक्रम सुरु आहे. आजपयर्र्त अनेक बाबतीत लक्ष्मण रेषा पुसट केल्या गेल्या आहेत पण देशभक्ती आणि देशद्रोहाच्या लक्ष्मणरेषा पुसट करण्याचा प्रयत्न या थरावर कधी झाला नव्हता. मोदी सरकार कोणत्याही राजकीय विरोधाला बळी जात नाही. कोणत्याही षडयंत्राला बळी जात नाही म्हंटल्यावर मग मोदींचा अश्वमेघी वारु रोखण्यासाठी डाव्या कम्युनिस्टांनी आणि कॉंग्रेसने ही अतिशय...27 March 2016 / No Comment / Read More »
Author : Amar Puraniktweet
•चौफेर : अमर पुराणिक• राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कॉंग्रेसच्या भानगडींची लख्तरं महाराष्ट्राच्या वेशीवर टांगली जात आहेत. महाराष्ट्र सदनाच्या बांधकामातील घोटाळा आता बाहेर आला आहे. आणखीही प्रकरणे पुढे बाहेर येतील. गेली पंधरा वर्षे सत्तेचा यथेच्च उपभोग घेताना राक्षसी भ्र्रष्टाचार करत जनतेचा पैसा हवा तसा लूटला आणि आपल्या तुंबड्या भरल्या. पण ‘भगवान के घर मे देर है, अंधेर नही’ असे म्हणतात ते खरेच आहे. देशातील आणि राज्यातील भ्र्रष्ट नेत्यांना याची परतफेड याच जन्मात करावी लागणार आहे. अशा भ्रष्टनेत्यांची वाट तुरुंगाकडेच जाते...20 March 2016 / No Comment / Read More »
Author : Amar Puraniktweet
•चौफेर : अमर पुराणिक• आजपर्यंत सादर झालेल्या अर्थसंकल्पाहून हा अर्थसंकल्प खूप वेगळा आहे. या अर्थसंकल्पातून हे प्रतीत होते की, केंद्र सरकार कृषी क्षेत्रावर नव्या प्रणालीद्वारे ठोस कार्यक्रम आणि त्याच्या योग्य क्रियान्वयनावर आधारित कार्य करु इच्छिते. याचा अर्थ सरकार मूलभूत बदल घडवणार्या, दूरागामी परिणाम साधणार्या योजनांवरच नव्हे तर व्यवस्था परिवर्तन घडवणार्या बाबीवर लक्ष केंद्रीत करताना दिसतेय. वर्तमान राष्ट्रीय आणि आंतराष्ट्रीय स्थितीत केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी सादर केलेला अर्थसंकल्प पुर्ण कस लागलेला आणि संतुलित आहे. आजपर्यंत सादर झालेल्या अर्थसंकल्पाहून...6 March 2016 / No Comment / Read More »
Author : Amar Puraniktweet
•चौफेर : अमर पुराणिक• विरोधकांनी जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील देशद्रोही घोषणांच्या मुद्द्यावरुन केंद्रीय मानव संसाधन मंत्री स्मृती इराणी यांना लक्ष्य करुन गदारोळ केला. पण स्मृती इराणी यांनी विरोधकांच्या प्रश्नांना सडेतोड उत्तरं दिली. विरोधकांच्या प्रश्नांना म्हणण्यापेक्षा गोंधळाला म्हणाव लागेल. स्मृती इराणी यांनी अक्षरश: विरोधकांची पळता भुई थोडी केली, बहुसंख्य विरोधकांनी पळच काढला. सोशल मिडीयतून स्मृती इराणी यांचा लोकसभेतील भाषणाच्या त्या व्हिडीओचा अक्षरश: पाऊसच पडला. बुधवारचा दिवस भारतीय संसदेच्या इतिहासात संस्मरणीय असाच ठरला. केंद्रीय मानव संसाधन मंत्री स्मृती इराणी यांनी संसदेत...28 February 2016 / No Comment / Read More »
Author : Amar Puraniktweet
•चौफेर : अमर पुराणिक• सध्या ज्यापद्धतीने जवाहरलाल नेहरु विद्यापीठातील घटनेसारख्या राष्ट्रविरोधी घटना घडत आहेत त्यावरुन देशात अराजक माजवण्याचाच हा प्रयत्न आहेत हे स्पष्टच आहे. पाकिस्तान प्रायोजित आतंकवादाचे समर्थन राहुल गांधी, अरविंद केजरीवाल, सेक्यूलर आणि कम्यूनिस्टनेते करत आहेत. पण आता सरकारने असली राष्ट्रविरोधी कृत्ये आणि राष्ट्रविरोधकांना निर्दयपणे ठेचून काढले पाहिजे. आपल्या देशातील राजकारणाचा स्थर इतका घसरला आहे की, काही नेते आपल्या राजकारणाच्या फायद्यासाठी कोणतीही भूमिका घेत आहेत. मग ती राष्ट्रद्रोहाची भूमिका का असेना. जवाहरलाल नेहरू विद्यापीठात राष्ट्रविरोधी घोषणा देण्याचा...21 February 2016 / No Comment / Read More »
Author : Amar Puraniktweet
•चौफेर : अमर पुराणिक• युती-प्रतियुतीच्या राजकारणात जनता काय मागते याचा विचार करणे महत्त्वाचे आहे. कोणाची युती कोणाशी होते यापेक्षा जनतेचा कल कोणत्याबाजूने आहे यावर सर्वांचे यशापयश अवलंबून आहे. गठबंधन, महागठबंधन करुन काय होते ते पश्चिम बंगालची जनता बिहारमध्ये पहात आहे. तेथे नीतिश कुमार आणि लालू यांच्या नेतृत्वा जंगलराज सुरु झाले आहे. पश्चिम बंगालची जनता पश्चिम बंगालमध्ये जंगलराज इच्छिनार नाहीच त्यामुळे शेवटी जनताच जनार्दन आहे. जनता जे इच्छिल तेच होईल. पश्चिम बंगालमध्ये तीन महिन्यांनंतर विधानसभा निवडणुका होत आहेत. हिंसा,...14 February 2016 / No Comment / Read More »
Author : Amar Puraniktweet
•चौफेर : अमर पुराणिक• भाजपा सरकारने कृषी क्षेत्रातील गुंतवणुकीत विक्रमी भरारी घेतली आहे. भारतासारख्या कृषीप्रधान देशासाठी हा पुरक निर्णयच म्हणावा लागेल. त्यामुळेच कृषीक्षेत्रातील गुंतवणुकीला मोठे यश मिळाले आहे. सरकारच्या औद्योगिक नीती आणि संवर्धन विभागाद्वारे दिनांक २९ जानेवारी रोजी जारी केलेल्या अधिसूचनेनुसार सन २०१५ मध्ये कृषी क्षेत्रात ५९०० अब्ज डॉलरची विदेशी गुंतवणुक झालेली आहे, जी गेल्या वर्षाच्या तुलनेत ३६ टक्क्याहून अधिक आहे. मोदी सरकारचा हा भीम पराक्रमच म्हणावा लागेल. विदेशी गुंतवणुकीतील ही वाढ अमेरिका आणि चीनच्या तुलनेत खुप मोठी...7 February 2016 / No Comment / Read More »
Author : Amar Puraniktweet
•चौफेर : अमर पुराणिक• कोणत्याही पक्षाचे यश हे त्यापक्षाच्या पाळामुळांवर अवलंबून आहे. जितकी पक्षाची पाळेमुळे रुजतील तितके यश हुकमी ठरत असते. त्यामुळे भाजपाला आता पक्ष बळकटीवर संपुर्ण लक्ष केंद्रीत करण्याशिवाय गत्यंतर नाही. भाजपाध्यक्ष अमित शहा हे कुशल संघटक आहेत, पक्षात आणि जनतेत त्यांची प्रतिमा खूप चांगली आहे. याचा लाभ त्यांना आणि भाजपाला मिळेलच यांत दूमत नाही. आपली दूसरी इनिंग अमित शहा अतिशय प्रभावीपणे राबवतील आणि भाजपाला अभूतपुर्व यशाचे धनी बनवतील यात शंका नाही. भाजपा नेते अमित शहा दूसर्यांदा...31 January 2016 / No Comment / Read More »
Author : Amar Puraniktweet
•चौफेर : अमर पुराणिक• ज्या देशात व्यवसाय प्रारंभ करणे आणि तो सातत्याने यशस्वीरित्या चालवणे सोपे आहे असेच देश विकसित आणि संपन्न होऊ शकले आहेत. आणि ज्या देशात व्यवसाय करणे अवघड आहे ते देश अविकसित अवस्थेत पिचत पडले आहेत. ब्रिक्स देशात भारत हा व्यवसाय करण्यात आणि नवा व्यवसाय सुरु करण्यात सर्वात मागे आहे. जोपर्यंत भारतात उद्योग-व्यवसाय करणे आणि चालवणे सुलभ होत नाही तोपर्यत विकास आणि संपन्नतेची अपेक्षा करणे व्यर्थ आहे. भारतात एक म्हण प्रचलीत आहे आणि ती खरी आहे...24 January 2016 / No Comment / Read More »