Author : Amar Puraniktweet
•चौफेर : अमर पुराणिक• विकसनशील देशांत भारत आणि चीनची अर्थव्यवस्था खूप मोठी आहे त्यामुळे पाश्चिमात्य अर्थशास्त्रज्ञ या दोन्ही देशांचा तुलनात्मक अभ्यास मोठ्याप्रमाणावर करत आहेत. त्यांची अनेक भाकिते आपल्यासाठी फायदेशीर ठरु शकतात. डॉ. कौशिक बसु यांनीही यावर भाकित केले आहे की, २०२४ पर्यंत भारताचा विकासदर चीनपासून खूप पुढे गेलेला असेल. निश्चितच सत्तारुढ असलेल्या भाजपाचे मनोबल वाढणारेच हे भाकित आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अथक परिश्रमांचे फळ सर्व भारतीयांना मिळणार आहे. मोदी सरकार हे भारतीय अर्थव्यवस्थेची चिंता करणार्यांना समाधान देणारे...17 January 2016 / No Comment / Read More »
Author : Amar Puraniktweet
•चौफेर : अमर पुराणिक• माध्यमांनीही पठाणकोट हल्ल्याच्या मुद्द्यावरुन राष्ट्रीय धोरणांच्या चिंध्या करण्यात कोणतीही कसर ठेवली नाही. आपणा सर्वांना माहित आहे की, मुंबई आतंकवादी हल्ल्याच्या वेळी माध्यमातील थेट प्रसारणाचा लाभ आतंकवाद्यांनी घेतला. त्या घटनेनंतर थोडीफार सावध भूमिका माध्यमानी घेतलेली असली तरी बातम्या किंवा घटना प्रसारित करताना स्वैरपणा काही कमी झालेला नाही. माध्यमे स्वत: सूत्रांच्या(?) हवाल्याने तर्हे-तर्हेची अर्धवट, संदिग्ध आणि दिशाभूल करणारी माहिती देत असतात आणि स्वत:च प्रश्न उभा करतात. हे कोठे तरी थांबले पाहिजे. नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच पठाणकोट येथील...10 January 2016 / No Comment / Read More »
Author : Amar Puraniktweet
•चौफेर : अमर पुराणिक• पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या या आकस्मिक पाकिस्तान भेटीचे राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर स्वागत केले गेले. पण कॉंग्रेसला मात्र नरेंद्र मोदी यांची पाकिस्तान भेट पचनी पडली नाही. कॉंग्रेस पक्षाचे प्रवक्ते मनीष तिवारी अतिशय त्वेषाने विचारत होते की, मोदींनी देशाला सांगावे की नवाज शरीफ यांच्याशी काय बोलणी झाली. हे दुरचित्रवाणीवर पहात असताना ते राजकीय नेते न वाटता वाहिनीवरील सूत्रधार असल्याच्या थाटात त्वेषाने बोलत होते. प्रत्येक वाक्यागणिक ‘देश जानना चाहता है’ ची आवर्तनं सुरु होती. अशी विधान करुन...3 January 2016 / No Comment / Read More »
Author : Amar Puraniktweet
•चौफेर : अमर पुराणिक• कॉंग्रेस आणि अन्य विरोधी पक्षांना आता हे समजून घ्यावे लागेल की, त्यांच्याकडून होणार्या विरोधाच्या नावावर अशाच नकारात्मक राजकारणाचा सतत परिचय दिला जात राहिला तर सामान्य जनतेत त्यांची प्रतिमा विकास विरोधी पक्ष अशी ठसेल. खरेतर तशी प्रतिमा आधीपासूनच ठसलेली आहे ती आणखीन गडद होत आहे. संसदीय कामकाज न चालणे हे कोणाच्याही हिताचे नाही. संसद नकारात्मक राजकारणाची बंधक बनल्याचे चित्र जनतेसमोर आणखीन प्रखरतेने समोर येत आहे. संसद वाद-विवाद, संवादाबरोबरच निर्णायक कृती करुन देशाचा विकास साधण्यासाठी आहे....20 December 2015 / No Comment / Read More »
Author : Amar Puraniktweet
•चौफेर : अमर पुराणिक• न्यायालयीन कार्यवाही आणि निर्णय सरकारच्या माथी मारण्याचा उद्योग कॉंग्रेसने चालवला आहे. लोकसभेचे आणि राज्यसभेचे कामकाज गोंधळ घालून बंद पाडले गेले. सोनिया गांधी यांच्या मार्गदर्शनाखाली कॉंग्रेसचे खासदार संसदेत गोंधळ घालत होते हे उभ्या देशाने पाहिले. नॅशनल हॅराल्ड प्रकरणावरुन सोनिया गांधी यांनी ‘मै इंदिरा गांधी की बहू हूं, किसीसे डरनेवाली नही हूँ’ असे विधान केले. गांधी घराणे सोनिया गांधी, राहूल गांधी हे या राष्ट्रापेक्षा, भारताच्या संविधानापेक्षा मोठे आहे काय? असा प्रश्न उपस्थित होतो. ‘वन मॅन आर्मी’...13 December 2015 / No Comment / Read More »
Author : Amar Puraniktweet
•चौफेर : अमर पुराणिक• गेल्या वीस वर्षात देशात इतके दहशतवादी हल्ले झाले, बॉम्ब स्फोट झाले, अब्जावधींची भ्रष्टाचारांची प्रकरण उघडकीस आली तेव्हा या अमीर खान, शाहरुख खानाला असुरक्षित वाटले नाही. पण आता मोदी सरकार सत्तेत आल्यापासून देशात अशा घटना घडल्या नाहीत तरी या खानाला अचानकच असुरक्षित वाटू लागते याला काय म्हणावे. प्रेक्षक, जनता दूधखूळी वाटली की काय याला? बिहार निवडणूकीआधीपासून काही सेक्यूलर विचारवंत, लेखकांकडून आणि विशेषत: माध्यमांकडून पद्धतशीरपणे असे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न सुरु झाला. त्यात आता चित्रपट अभिनेता...29 November 2015 / No Comment / Read More »
Author : Amar Puraniktweet
•चौफेर : अमर पुराणिक• मणीशंकर अय्यर आणि सलमान खुर्शिद यांनी पाकिस्तानमध्ये जाऊन भारताविरोधात गरळ ओकली आहे. पाकिस्तानमधील वृत्तवाहिनीवर बोलताना मणीशंकर अय्यर यांनी पाकिस्तानकडे याचना केली, अक्षरश: भीक मागितली आहे की, पाकिस्तानने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना हटवावे. भारतीय जनतेने बहुमताने निवडलेले सरकार हटवण्याची मागणी भारताच्या विरोधी पक्षाचा नेता, कॉंग्रेसचा नेता पाकिस्तानकडे करतो यातच यांच्या राष्ट्रद्रोही वृत्तीचे पुरावे आले. नुकतेच बिहार विधानसभा निवडणुकीचे निकाल लागले. त्याचा आनंद जदयु-राजद आणि महागठबंधनातील इतर पक्षांना नेत्यांना आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना झाला आणि त्यांना आनंद...22 November 2015 / No Comment / Read More »
Author : Amar Puraniktweet
•चौफेर : अमर पुराणिक• राष्ट्रीय स्थरावर मोदींच्या करिश्म्यावर निवडणूका भाजपा सहज जिंकेल पण स्थानिक स्थरावर भाजपा कमकुवत आहे. भाजपाला आता स्थानिक स्थरावर पक्षबांधणीकडे लक्ष देण्याशिवाय पर्याय नाही. लोकसभा निवडणूका जिंकल्यानंतर भाजपाकडून स्थानिक स्थरावर पक्षबांधणीच्यादृष्टीने प्रयत्न होताना दिसले नाहीत. आता बिहारच्या निकालानंतर भाजपाला पक्षबांधणीचा विचार करणे अपरिहार्य आहे. कारण कोणत्याही पक्षाचे खरे बळ हे स्थानिकबळावर अवलंबून असते. नुकतेच बिहार विधानसभा निवडणुकीचे निकाल लागले. लालूप्रसाद यादव, नीतिश कुमार यांच्या महागठबंधनने निर्विवाद बहूमत मिळवले. भाजपाचा पराभव झाला. अनेकजण आपापल्यापरिने निकालाचे विश्लेषण...15 November 2015 / No Comment / Read More »
Author : Amar Puraniktweet
•चौफेर : अमर पुराणिक• पाकिस्तानमध्ये येऊ घालणार्या भयानक स्थितीची जाणीव बहुदा पाकिस्तानी माध्यमांना झाली आहे. काही आंतरराष्ट्रीय अभ्यासकांनी पाकिस्तानचे तुकडे होण्याची शक्यताही वर्तवली आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या धोरणाकडे पाकिस्तानी माध्यमं अतिशय गंभीरपणे पहात आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी, परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज, संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांनी गेल्या काही महिन्यात केलेली विधाने आणि कृती पाहता देशवासियांना खात्री झाली आहे की, आता पाकिस्तानची खैर नाही. पाकिस्तानची स्थिती गेल्या काही दिवसांपासून खूपच वाईट झाली...1 November 2015 / No Comment / Read More »
Author : Amar Puraniktweet
•चौफेर : अमर पुराणिक• सर्व थरातून भारताच्या ऐक्याला, विकासाला बाधा आणण्याचे उद्योग अतिरेक्यांप्रमाणेच हे सेक्यूलरवादीही करत आले आहेत. तस्लिमा नसरिन यांनी अशा आस्तिनातील निखार्यांच्या मुस्काटात मारली त्याबद्दल त्यांचे अभिनंदनच करायला हवे. कारण या विषयावर थेट बोलण्याचे धाडस बहूदा आजपर्यंत कोणी केलेले नसावे. पहिल्यांदाच भारतात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात कणखर सरकार भारताला लाभल्यामुळे तस्लिमा नसरिन यांनी बोलण्याचे धाडस केले. तस्लिमांना हा विश्वास आहे की मोदी अयोग्य वागणार नाहीत म्हणूनच त्या हा गंभीर विषय बोलल्या. तस्लिमा नसरिन यांनी ढोंगी...25 October 2015 / No Comment / Read More »