Home » Blog » वक्रदृष्टी फक्त हिंदुधर्मीय आणि देवळांवरच

वक्रदृष्टी फक्त हिंदुधर्मीय आणि देवळांवरच

सडेतोड : अरुण रामतीर्थकर

गाच्या नकाशावर नजर टाकली, तर ४८  टक्के देश ख्रिस्ती आणि ४८ टक्के देश मुस्लिम आहेत. उर्वरित ४ टक्क्यांमध्ये ज्यू, बौद्ध आणि निधर्मी देश आहेत. ५ ते १० लाख एवढीच लोकसंख्या असलेले अनेक मुस्लिम आणि ख्रिस्ती देश आहेत. मात्र जगात १०० कोटींपेक्षा अधिक संख्येने असलेल्या हिंदू धर्मीयांसाठी एकही देश नाही. त्यामुळे छेड काढणे, अपमानित करणे हे सर्व हिंदूंच्याच वाट्याला येते. डेन्मार्कच्या एका चित्रकाराने प्रेषिताचे व्यंगचित्र काढले किंवा सलमान रश्दीने सैतानाची बाजू मांडली, तर जगातील प्रत्येक इस्लामी देशातून त्याचा धिक्कार झाला. सलमान रश्दीचा खून करणार्‍याला इराणने त्याच्या (खुन्याच्या) वजनाएवढे सोने देण्याची घोेषणा केली होती. अशीच घोषणा उत्तर प्रदेशच्या एका मुस्लिम मंत्र्याने डॅनिश चित्रकाराच्या संदर्भात केली होती. मात्र एम.एफ. हुसेन नावाच्या विकृत माणसाने देवदेवतांची अश्‍लील, बीभत्स चित्रे काढल्यावरही त्याला थोर चित्रकार म्हणणारे हिंदूच निघतात. हे जन्महिंदू अशी अक्कल पाजळतात. कारण ख्रिस्ती, इस्लामीप्रमाणे धर्मपीठे, धर्मशिक्षण, धर्मसंस्कार यांचा हिंदूंशी संबंध सरकारनेच तोडला आहे.

हिंदू असे बेवारशी आणि निराधार झाले आहेत. श्रीलंकेतील तामिळींच्यावरील अत्याचाराचा आपला देश निषेध करतो, पण पाकिस्तानात हिंदू मुलींचे अपहरण, सक्तीने निकाह असे रोज प्रकार घडत आहेत. फाळणीच्या वेळी २० टक्के असलेले पाकिस्तानातील हिंदू आता ४ टक्के उरले आहेत. या अत्याचाराच्या विरोधात अमेरिकेच्या सीनेटमध्ये एक खासदार आवाज उठवतो, पण आपले सरकार पाकिस्तानाला जाब विचारत नाहीत. पाकिस्तानातील असुरक्षित हिंदूंनी दाद कोणाकडे मागायची? आपले सरकार तर इतके नालायक आहे की, पाकिस्तान, बांगला देशातील लाखो मुस्लिम घुसखोरांना सर्व सुखसोयी देते, पण पाकिस्तानातून आलेल्या हिंदूंच्या जथ्याने येथेच राहू देण्याचे आर्जव केले तर क्रूर एस.एम. कृष्णा म्हणतो, ‘मायदेशी परत जा.’ १९४६ साली नौखालीत बलात्कार झालेल्या हिंदू महिला गांधीजींना भेटण्यास आल्या तर गांधीजींनी त्यांना बलात्कार करणार्‍यांबरोबरच राहायला सांगितले होते. पाकिस्तानात खुले आम हिंदू तरुणींवर बलात्कार, सक्तीने धर्मांतर होत असताना, नरकासुराच्या तावडीतून सहस्त्रनारींची मुक्तता करणार्‍या भगवान श्रीकृष्णाचे नाव धारण करणारे मनमोहन व कृष्णा हिंदू कुटुंबांना सांगतात, ‘पाकिस्तानात परत जा.’ गांधीजींचे खरे वारस आहेत. पाकिस्तान आणि बांगला देशातून आलेल्या लाखो मुस्लिमांपैकी एकालाही आपले सरकार निर्धारपूर्वक परत जा असे म्हणणार नाही. कारण फक्त हिंदूच बेवारशी आणि निराधार आहेत.
रशियात १९१७ पासून १९९० पर्यंत सर्व चर्च आणि मशिदी कुलूपबंद अवस्थेत होत्या. त्यातीलच एका चर्चला शोध लागला की, हिंदूंचा धर्मग्रंथ दहशतवादी आहे. हे चर्च अशी आगळीक दुसर्‍या कोणत्या धर्माबाबत करू शकते का? चर्चचा अर्ज फेटाळला गेला असला तरी भगवतगीतेबद्दल चर्चच्या मनात असलेले अभद्र विचार आले याला कारण हिंदू बेवारशी आणि निराधार आहेत. याच रशियात पीटस्‌बर्ग शहरात वेदाभ्यासाचे एक केंद्र आहे. नगरपालिकेच्या परवानगीनेच ते सुरू झाले होते.२९ वर्षांचा करार असताना मध्येच ते केंद्र बंद पाडण्यात आले. भारत सरकार काय म्हणेल याची भीती पुतीन किंवा मेदवेदेव यांना वाटली नाही. कारण भारत सरकार निधर्मी आहे. हिंदूंचे नाही. हिंदूंना जगात कोणीच वाली नाही.
युरोपची तर्‍हा वेगळीच आहे. हिंदू देवाचे चित्र पादत्राणावर काढण्याचे विचार मोठ्या आस्थापनांच्या उच्चशिक्षित अधिकार्‍यांच्या मनात का येतात? स्त्रियांच्या अंतर्वस्त्रावरही देवांची चित्रेे आली होती. त्या त्या देशातील सतर्क हिंदूंनी वैयक्तिक पातळीवर प्रयत्न करून ही उत्पादने बंद पाडली. मुस्लिम आणि शीख यातील फरक समजण्याची अक्कल नसलेले हे युरोपीय लोक. देवदेवतांचा अपमान करण्याची अक्कल कशी आपोआप येेते. अशी आगळीक ते फक्त हिंदू धर्माच्याच बाबतीत करू शकतात. कारण हिंदू बेवारस आणि निराधार आहेत.
हे झाले परदेशातील. हिंदूच्या बाबतीत अहिंदू असेच वागणार. मात्र आपल्याच देशातील काही जन्महिंदूचे काय? या देशातील नैसर्गिक साधनसंपत्तीवर पहिला अधिकार मुस्लिमांचा आहे, असे पंतप्रधान मनमोहनसिंग बिनदिक्कत म्हणून गेले. या वाक्याने मुस्लिमांची ४ जादा मते मिळतील, पण कॉंग्रेसचे एकही हिंदू मत कमी होणार नाही याची त्यांना खात्री होती. वाटणारच. १९६९ साली राबात (मोरोक्को) येथे झालेल्या इस्लामी देशांच्या परिषदेस इंदिरा गांधींनी फक्रुद्दिन अली अहमद यांना भारताचे प्रतिनिधी म्हणून पाठवले. त्यांना तेथून अक्षरशः हाकलून देण्यात आले हा भाग वेगळा. हा देश मुस्लिम आहे, असे इंदिरा गांधींना वाटले, पण देशात बहुसंख्य हिंदू आहेत, असे त्यांना कधीच वाटले नाही. राजीव गांधींनी मिझोरामच्या निवडणुकीत बायबलवर आधारित राज्य आणू असे जाहीर आश्‍वासन दिले. निर्वाचन आयोगास चालले. हिंदू राष्ट्र किंवा रामराज्य याचा उच्चार केलेलाही येथे कोणाला चालत नाही. लगेच तो जातीयवादी ठरतो.
याच सरकारने निधर्मीपणाचा टेंभा मिरवत फक्त मंदिरांचेच व्यवस्थापन स्वतःकडे घेतले. सरकारने हा उद्योग करावा का, असा प्रश्‍न एकाही सेक्युलरला पडला नाही. येथे मात्र फक्त हिंदूच डोळ्यासमोर येतो यातून भक्तांची सोय चांगली झाली म्हणावे, तर तसेही नाही. पब्लिक सेक्टर युनिटची जशी वाट लागली. तशी देवळांची वाट लावण्याचे काम पैसे खात होत आहे. तिरुपती बालाजींचा लाडू प्रसाद असला तरी काळा बाजार होतो. मी स्वतः २५ लाडू घेऊन बरोबर आलो आहे. लाडवांचा आकार लहान झाला. पूर्वीसारखा तो फार दिवस टिकत नाही. २हजार कोटींचे वार्षिक उत्पन्न, ९८ विभाग, १० हजार कर्मचारी. मग व्यवस्था चोख हवी. निवास आणि दर्शन दलाल गाठला की लगेच मिळते. स्त्री-पुरुष केस अर्पण करतात. त्यातून काही कोटी रुपये उत्पन्न मिळते. केशकर्तन विनामूल्य असले तरी न्हाव्याला ५० ते १०० रु. द्यावे लागतात. कारण त्या पाचशे नाव्ह्यांंच्या प्रमुखाला वाटा द्यावा लागतो. मुद्रणालय बंदच असते. कारण त्यात १५० कोटींचा भ्रष्टाचार झाला आहे. तिरूपती देवस्थान भ्रष्टाचाराचे आगर झाले आहे.
शिर्डीत साईबाबांचे हाल तसेच. जयंत ससाणे नावाचा माणूस गेली पाच वर्षे बेकायदा कारभार पाहतो. उच्च न्यायालयाने त्याला बडतर्फ करत नवे विश्‍वस्त नेमायला सांगितले तर महाराष्ट्र सरकारने पुन्हा त्यालाच नेमले. उच्च न्यायालयाने त्याला पुन्हा काढून जिल्हा न्यायाधीशाकडे कारभार सोपवला. रस्ता बांधणे हे सरकारचे काम असताना ससाणेंनी न झालेल्या रस्त्यांवर चक्क ५० कोटी रु. खर्च केले. अशी अनेक प्रकरणे आहेत. मुंबईच्या सिद्धीविनायक ट्रस्टचा कारभार असाच आहे. उगीच कॉंग्रेस-राष्ट्रवादीचे कार्यकर्ते मंदिराचे ट्रस्टी होण्यासाठी जीव टाकत नाहीत. भक्ती शून्य खाबुगिरी १०० टक्के. कोल्हापूरच्या महालक्ष्मी मंदिराचे व्यवस्थापन सरकारकडे आहे. देवळातील दानपेटीचा वाद न्यायालयात असताना कोल्हापूरच्या जिल्हाधिकार्‍यांनी तेथे दानपेटी बसवली. हा न्यायालयाचा अवमान आहेच, पण कलेक्टरचे लक्ष दानपेटीकडेच का असा प्रश्‍न पडतो. तुळजापूरला तर लक्ष द्यायला कलेक्टरना वेळ नाही. देणग्या, वस्तू, दागिने यांचा हिशोबच नाही.
वाईट याचे वाटते की, देवळात लूट करणारे हिंदूच आहेत. पूर्वी मोहंमद बिन कासीम, अल्लाउद्दिन खिलजी, बाबर, औरंगजेब यांनी देवळे लुटली. निदान ते परधर्मीय होते, पण हे जन्महिंदू रोज देवळे लुटत आहेत. दिवेआगरचा १॥ किलोचा सुवर्ण गणेश ५० लाखांचा आहे. येथे ५० कोटींवर डल्ला मारला जातो. देवळात अशी लूट करण्यासाठीच त्यांची नेमणूक केली जाते. देवळे त्यासाठीच सरकार ताब्यात घेते. निधर्मी सरकार फक्त देवळांच्या कारभारात ढवळाढवळ करते. का तर हिंदू ते सहन करतात. इतर धर्मिय असे खपवून घेणार नाहीत.
प्रश्‍न असा आहे की, हिंदूंच्या आणखी किती पिढ्यांनी असा जुलूम सहन करायचा?
रविवार, दि. ०८ एप्रिल २०१२
Posted by : | on : 25 May 2012
Filed under : Blog
Author Description : I am Amar Puranik from Solapur. I am a Journalist and Webdeveloper..
You can follow any responses to this entry through the RSS 2.0
You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *