Home » Blog, चौफेर : अमर पुराणिक, राजकीय, स्थंभलेखक
भाजपाचं झंझावाती नेतृत्व

भाजपाचं झंझावाती नेतृत्व

Author : •चौफेर : •अमर पुराणिक• आजपर्यंत देवेंद्र फडणवीस यांच्या प्रभावी कार्यशैलीचा उभ्या महाराष्ट्राला चांगलाच परिचय झालेला आहे. ते शांत स्वभावाचे अन् आक्रमक म्हणूनही प्रसिद्ध आहेत. अभ्यासू, अजातशत्रू, धोरणी आणि अनुभवीही असणारे देवेंद्र फडणवीस यांची भाजपाच्या प्रदेश अध्यक्षपदी निवड झाल्याने महाराष्ट्र भाजपात एक नवचैतन्य निर्माण झाले आहे. भाजपा नेते, कार्यकर्त्यांनी त्यांच्या निवडीचे जल्लोषात स्वागत तर केलेच, पण नागरिक आणि बिगर भाजपामतदारांनीही देवेंद्र फडणवीस यांच्या प्रदेश भाजपाध्यक्षपदी निवड झाल्याचा ‘योग्य व्यक्ती निवडला’ अशा शब्दात आनंद व्यक्त केला. हीच बाब महाराष्ट्र भाजपाच्या...
नितीश कुमारांचे अनीतीशास्त्र

नितीश कुमारांचे अनीतीशास्त्र

Author : •चौफेर : •अमर पुराणिक•  नुकत्याच झालेल्या जदयुच्या कार्यकारिणीच्या बैठकीत देखील नितीश कुमार यांनी नरेंद्र मोदी यांचे नाव न घेता त्यांच्यावर सडकून टीका केली. आम्हाला भाजपा हवी आहे, पण मोदी नको. अशीच भूमिका मांडत नरेंद्र मोदी यांना पंतप्रधानपदाचा उमेदवार म्हणून नाकारण्याची मानसिकता कायम ठेवली आहे. मुळात नितीश कुमार हे भाजपाच्या भक्कम पाठिंब्यावर आज बिहारचे मुख्यमंत्री म्हणून विराजमान आहेत, हे वरील विधाने करत असताना नितीश कुमार विरसत आहेत. बिहारच्या विकासातील भाजपाचे योगदान हे मोठे असतानाही नितीश कुमार ते सोयिस्कररित्या झाकण्याचा...
मोदीमंत्राचा दणका आणि माध्यमांचा थयथयाट

मोदीमंत्राचा दणका आणि माध्यमांचा थयथयाट

Author : •चौफेर : •अमर पुराणिक• दिल्लीतील तालकटोरा स्टेडियमवर भाजपाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक झाली. या कार्यकारिणीच्या दिनांक ३ मार्च रोजी झालेल्या समारोपाच्या भाषणात भाजपाच्या चार हजार प्रतिनिधींना संबोधित करताना नरेंद्र मोदी काय बोलले आणि प्रसारमाध्यमांनी काय प्रसिद्ध केले किंवा प्रसारित केले हा नेहमीप्रमाणेच याही वेळी संशोधनाचा मुद्दा आहे. नरेंद्र मोदी जे बोलतात त्यातील केवळ स्वत:च्या सोयीचीच विधाने तीही मूळ स्वरूपात न देता तोडून मोडून विपर्यास्त करून जाणीवपूर्वक संभ्रम निर्माण करणारी वक्तव्ये प्रसिद्ध करतात. हे भाजपा बाबतीत कायमच होते. नरेंद्र मोदींच्या...
कशाला हवाय ऑस्कर!

कशाला हवाय ऑस्कर!

Author : •चौफेर : •अमर पुराणिक•  हे सर्व प्रकार पाहिल्यानंतर सनी देओल जे म्हणतो त्यातील तथ्य लक्षात येऊ शकते. असे अनेक विकृत प्रकार न करता देखील अनेक चांगले चित्रपट देता येऊ शकतात. अनेक भारतीय चित्रपट निर्माता-दिग्दर्शकांनी असे उत्तमोत्तम चित्रपट दिलेले आहेत. अनेक चित्रपटांनी इतिहास निर्माण केलेला आहे, हे विसरता कामा नये. उत्तम दर्जाला उत्तम बाजारपेठ मिळते हे त्रिकालाबाधित सत्य आहे. त्याला फक्त योग्य प्रसिद्धी मिळाली पाहिजे. असे झाले तर चांगल्या चित्रपटांचे नक्कीच कौतुक होते, झालेले आहे. मग ते समांतर सिनेमे...
हाय रे अफझल…!

हाय रे अफझल…!

Author : •चौफेर : •अमर पुराणिक• अलिगढ मुस्लिम विद्यापीठातील राष्ट्रविरोधी घोषणाबाजी किंवा सईदची यासिनने घेतलेली भेट, याबाबीचे कोणालाच गांभीर्य वाटले नाही. शेवटी ‘मला काय त्याचे’ ही वृत्ती एक दिवस आपल्यावर शेकणार आहे याची जाणिव आता  देशवासियांना कसोशीने ठेवावी लागणार आहे. जर आपण जागृत राहीलो नाही तर दुर्दैवाने जेव्हा तशी परिस्थिती येईल तेव्हा मात्र आपल्याला पळता भूई थोडी होणार आहे. याचा विचार गांभीर्याने करण्याची वेळ आली आहे. भारतातील प्रसारमाध्यमं असूद्यात, राजकारणी जमात असू द्या  नाही तर  स्वत:ला बुद्धीजीवी समजणारे मानवतावादी आणि...
वक्तव्यांचे परिमाण आणि परिणाम

वक्तव्यांचे परिमाण आणि परिणाम

Author : •चौफेर : •अमर पुराणिक• आता भारतातील मुस्लिम असुरक्षित असल्याची आवई उठवली जात आहे. सामान्य भारतीय मुसलमान नागरिकच काय तर बॉलिवुड अभिनेता शाहरुख खानही असुरक्षित असल्याचा गळा काढला जातोय. त्याच्या सुरक्षेची मागणी पाकिस्तान, आयएसआय आणि सईद सारख्या अतिरेक्याकडून केली जाते. हे बळ कशामुळे आले हे आता वेगळे सांगायला नको. आत त्यांचे हे अनैतिक बळ आणखीन वाढतच जाणार आहे. आंतरराष्ट्रीय समुदायात आता भारताला सतत हे ओरडून सांगावे लागणार आहे की, भारत दहशतवादाला खतपाणी घालत नाही. हिंदू दहशतवाद नावाचा कोणताही प्रकार...
ज्वलंत प्रतिभेची सुजाता आणि भुंकणारा भालू

ज्वलंत प्रतिभेची सुजाता आणि भुंकणारा भालू

Author : •सडेतोड : अरुण रामतीर्थकर•  पण असे होणार नाही जाज्वल्य देशाभिमानी सुजाता पाटीलवर कारवाई होईल आणि धर्मद्रोही, राष्ट्रद्रोही भालचंद्र नेमाडे हा मोकाट सुटेल. कारण हा देश आता देशभक्तांचा राहिलेला नाही. याचे मूळ आपलाच नाकर्तेपणा आणि आंधळे मतदान यात आहे. जानेवारी २०१३ च्या पहिल्या पंधरवड्यात साहित्यिक आविष्काराची दोन रूपे प्रगट झाली. एक जेवढे संतोषजनक होते तेवढेच दुसरे संतापजनक होते. दोन महिन्यांपूर्वी नितीन गडकरी म्हणाले होते. देव सर्वांना बुद्धी देतो. त्याचा चांगला वापर केला तर स्वामी विवेकानंद होतो आणि वाईट वापर...
विषय अनेक, अग्रक्रम कशाला?

विषय अनेक, अग्रक्रम कशाला?

Author : •सडेतोड : अरुण रामतीर्थकर• १५ मिनिटांत १०० कोटी हिंदू ठार मारतो, असे अकबर ओवैसी भारतात राहून म्हणतो, तर भारतीय सेनादल शतपट प्रबळ हे माहीत असून, त्यांचे सैनिक आपल्या हद्दीत येऊन मुुंडके कापून घेऊन जातात. त्यांनी आमचे गळे कापायचे आणि आमच्या राज्यकर्त्यांनी त्यांच्या गळ्यात गळा घालायचा हे बंद झाले पाहिजे. राज्यकर्ते नालायक आहेतच, पण पाकिस्तानी गायक, वादक, नट मल्ल क्रिकेटपटू यांचे कौतुक करणारे आपणही नालायक आहोत. हिंदुस्थानातातील पाकिस्तानप्रेम प्रथम संपायला पाहिजे. वृत्तपत्रात पहिले पान बघणार्‍यांचा हा नेहेमीचा अनुभव आहे....
तरुणीचा दोष काहीच नाही?

तरुणीचा दोष काहीच नाही?

Author : •सडेतोड : अरुण रामतीर्थकर• १६ डिसेंबरच्या रात्री दिल्लीत बलात्काराची शिकार झालेल्या आणि नंतर प्राणघातक हल्ला झालेल्या त्या तरुणीबद्दल मला कणव वाटते. असे घडायला नको होते, पण असे म्हणजे कसे? माझ्या मते त्या घटनेचे दोन भाग आहेत. ही तरुणी आणि तिचा प्रियकर बसमध्ये चढल्यानंतरचे दोन तास हा एक भाग आणि बसमध्ये चढण्यापूर्वीचे तीन तास हा दुसरा भाग झाला. सध्या जे चालू आहे ते म्हणजे इंडिया गेटवर मेणबत्त्या जाळणे आणि ‘बलात्कारियोंको फॉंसी दो’, असे बेंबीच्या देठापासून ओरडत म्हणायचे यातून फक्त...
कॉंग्रेसचे तोंड गडद काळे झाले

कॉंग्रेसचे तोंड गडद काळे झाले

Author : •सडेतोड : अरुण रामतीर्थकर• सेक्युलर बनण्याच्या नादात भाजपचे नुकसान होत आहे. उत्तर प्रदेशात तिसर्‍या क्रमांकावर फेकले जाणे आणि हिमाचल प्रदेशात ४१ वरून २६ होत सत्ता जाणे यामागे हेच कारण आहे. सध्या भाजपची ओळख कट्टर हिंदू अशीही नाही आणि सेक्युलर अशीही नाही. कितीही कसोशीने प्रयत्न केले तरी भाजपच्या सेक्युलॅरिझमवर कोणी विश्‍वास ठेवणार नाही; मग एकच पर्याय उरतो. गुजरातसारखे घवघवीत आणि लागोपाठ यश मिळवायचे तर हिंदुत्ववादाशिवाय पर्याय नाही. जरात विधानसभेच्या निकालाचे यथार्थ वर्णन म्हणजे हे एकच वाक्य, ‘विजय भाजप आणि...