Author : AMAR PURANIKtweet
दोन पटेल, दोन सौदे आणि दोन घोटाळे!•दिल्ली दिनांक : रवींद्र दाणीदोन पटेल आणि दोन सौदे! एक सौदा खासदार खरेदीचा, तर दुसरा सौदा विमान खरेदीचा. २०-२२ खासदारांना खरेदी करणारे अहमद पटेल, तर ६८ विमानांच्या खरेदीत अडकलेलेे प्रफुल्ल पटेल! येणारा घटनाक्रम या दोन पटेलांवर केंद्रित झालेला असेल, असा स्पष्ट संकेत देत, संसदेचे पावसाळी अधिवेशन संपले. १ ऑगस्ट रोजी अधिवेशन सुरू झाले तेव्हा चर्चा होती स्पेक्ट्रम घोटाळ्याची आणि समारोपाच्या दिवशी ८ सप्टेंबरचा केंद्रबिंदू होता, दोन पटेलांवर आणि त्यांच्या घोटाळ्यांवर! घोटाळ्याची पायाभरणीगुरुवारी...28 September 2011 / No Comment / Read More »
Author : AMAR PURANIKtweet
बॉम्बस्फोट, भारतीय सुरक्षा यंत्रणेला आव्हान•राष्ट्ररक्षा: व्रि. हेमंत महाजन दिल्ली संसदेवरील हल्ला प्रकरणातील आरोपी अफझल गुरू याची फाशीची शिक्षा माफ केली जावी, अशी मागणी करणार्या विधेयकावर जम्मू-काश्मीर विधानसभेत चर्चा केली जाणार आहे. राजीव गांधी हत्याप्रकरणातील आरोपींची फाशी माफ केली जावी, या आशयाचे विधेयक तामिळनाडू विधानसभेने पारित केल्यानंतर काश्मिरातही अफझल गुरूविषयीचे विधेयक सादर करण्यात आले. चर्चा आणि मतदानाने निर्णय अशी तरतूद असणार्या नियमांतर्गत हे विधेयक सादर झाले आहे. दिल्ली उच्च न्यायालयाच्या परिसरात झालेल्या बॉम्ब-स्फोटप्रकरणी एनआयएने महत्त्वाचा धागा सापडल्याचा दावा केला आहे....28 September 2011 / No Comment / Read More »
Author : AMAR PURANIKtweet
चीनला रोखण्याचा एकच मार्ग : व्हिएतनाम •अन्वयार्थ : तरुण विजय हे क्षेत्र गेल्या १० शताब्दींपासून भारताची संस्कृती आणि बुद्धाच्या उपदेशामुळे आपल्यासाठी मैत्रीपूर्ण राहिले आहे. मात्र मानसिक दास्यामुळे आपली नजर केवळ पाश्चिमात्य देशांकडे राहिली आणि चीनने या क्षेत्रात त्यांचा प्रभाव विस्तार करून टाकला. व्हिएतनाम चंपा देश या नावाने भारतीय साहित्यात ओळखला जातो. येथील शिवमंदिरे हजारो वर्षांपूर्वी बांधण्यात आलेली आहेत. दक्षिण-पूर्व आशियाई देशांमध्ये अनेक कारणांसाठी व्हिएतनामचे महत्त्व आहे. चीन चहू बाजूंनी घेरून भारताला अस्थिर करण्याच्या कामाला लागला आहे. या पार्श्वभूमीवर चीन...28 September 2011 / No Comment / Read More »
Author : AMAR PURANIKtweet
ब्रह्मदागखान बुगती •विश्वसंचार : मल्हार कृष्ण गोखले स्वित्झर्लंडमधलं जिनिव्हा हे शहर नाना प्रकारच्या आंतरराष्ट्रीय परिषदांचं शहर म्हणूनच ओळखलं जातं. जगभरच्या सर्व देशांमधले विविध प्रकारचे लोक नेहमीच तिथल्या रस्त्यांवर, बाजारात, रेस्टॉरंट्समध्ये पहायला मिळत असतात. तो पहा, छानसा सूट घातलेला, कोरीव दाढी ठेवलेला, उमदा आणि तरतरीत दिसणारा तरुण. वय जेमतेम तीस असेल. कोण आहे तो? कुणी प्राध्यापक? संशोधक? नाही? मग एखाद्या कॉर्पोरेट बँकेचा मॅनेजर तरी? नाही. यापैकी तो काहीच नाही. तो आहे ब्रह्मदागखान बुगती. बलुचिस्तानातल्या बुगती कबिल्याचा म्होरक्या. बलुच रिपब्लिकन...28 September 2011 / No Comment / Read More »
Author : AMAR PURANIKtweet
आम आदमीची बजेट बत्तीशी!•प्रहार : दिलीप धारुरकर भारतातील सर्वसामान्य माणसाची जी क्रूर चेष्टा भारत सरकारने आणि कॉंग्रेसने केली आहे तितकी आजवरच्या इतिहासात कोणीच केली नसेल. साहित्यात, राजकारणात, आक्रमकांनी कोणीच या देशातल्या माणसाची इतकी खिल्ली उडविली नसेल. या देशाच्या नियोजन मंडळाने आता न्यायालयात एक प्रतिज्ञापत्र दाखल करून ज्याच्या खिशात ३२ रुपये आहेत तो गरीब नाही अशी एक नवी व्याख्या मांडली आहे. ३२ रुपये हा आकडा काही मटक्याच्या आकड्याप्रमाणे काढलेला नाही. अगदी ३२ रुपयाचे विश्लेषण मांडले आहे. मराठी चित्रपटात कसा...28 September 2011 / No Comment / Read More »
Author : AMAR PURANIKtweet
जलवायू परिवर्तन व भारताची भूमिका •अमर पुराणिकजगाच्या किंवा देशाच्या विकासाचा संबंध हा प्रामुख्याने औद्योगीकरणाशी घातला जातो आणि जीवनमा सुधारणे याचा अर्थ जीवनात अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढविणे असा घेतला जातो. या सगळ्या गोष्टींना विकास असे म्हणण्याची प्रथा पडून गेली आहे. या विकासापोटी अनेक नैसर्गिक स्त्रोतांवर कुर्हाड कोसळली आहे. शेती, पाणी, जंगल या सगळ्यांना विकासाने गिळंकृत केले आहे. विकासाच्या मार्गावर चालत असताना पर्यावरणात होत असलेल्या या बदलाचे परिणामही दिसू लागले असून, निसर्ग आता या बदलांच्या रूपाने आपल्यावर सूड उगवीत आहे....24 September 2011 / No Comment / Read More »
Author : AMAR PURANIKtweet
टोपीचा वाद आणि वादाची टोपी मुस्लिमजगत : मुजफ्फर हुसैन भारताच्या विभाजनाच्यावेळी गांधी टोपीच्या समानांतर जिना यांच्या टोपीची चर्चा जोरात सुरू झाली होती. विभाजन करून वेगळा पाकिस्तान निर्माण करण्याच्या बाजूने असणार्यांनी याला टोपी न संबोधता इंग्रजी भाषेतील ‘कॅप’ शब्दाचा प्रयोग केला. म्हणूनच ‘जिना कॅप’ म्हणून ती जास्त प्रसिद्ध झाली. ती कॉंग्रेसपेक्षा वेगळे दिसू लागल्याने ‘कॅप’ हा शब्द स्वीकारला गेला. जिना यांच्या टोपीचा रंग काळा होता आणि त्यावर केसही होतेे. आजही त्यामध्ये काहीही परिवर्तन झालेले नाही. मात्र, जिनांची विशेष ओळख असलेल्या...24 September 2011 / No Comment / Read More »
Author : AMAR PURANIKtweet
पोकळ वर्गवार्यांत अडकलेले जणगणनेचे राजकारणअमर पुराणिकस्वातंत्र्यप्राप्तीनंतर खरे तर जातिव्यवस्था मोडून काढण्याच्या दृष्टीने स्वातंत्रवीर सावरकर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी खूप प्रयत्न केले होते. स्वा. सावरकरांना ब्राह्मण समाजाच्या वर्धापनदिनाच्या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून आमंत्रित करण्यात आले होते. तेव्हा स्वा. सावरकरांनी त्यांच्या भाषणात ‘ज्या घटना अखंड हिंदुस्थानाला आणि हिंदुत्वात बाधा निर्माण करु शकतील अशा कोणत्याही संघटनांच्या पाठीशी मी उभारणार नाही’, असे सांगून, ‘तुमच्या जातीच्या संघटनेचा लवकरच तेरावा होवो’ अशी आशा स्वा. सावरकरांनी व्यक्त केली होेती. १९३१ सालच्या जनगणनेत जात या घटकाबद्दल...23 September 2011 / No Comment / Read More »
Author : AMAR PURANIKtweet
चीनची सामरिकनिती आणि भारताविषयी धोरणेअमर पुराणिकसीमानिश्चितीचे स्पष्ट निर्धारण नसल्याने आपल्या देशावर काय संकटे येऊ शकतात, याचा सध्या सुरु असलेल्या चीनी घुसखोरीचा छोटासा नमुना आहे. सध्याचे सरकार अशा घटना घडतच असतात(?) असे सांगत वेळ मारून नेत आहे. हा प्रकार संपुआ सरकारने गंभीरपणे घेतलेला दिसत नाही. भारताला स्वातंत्र्य मिळून ६० वर्षे झाली. या साठ वर्षांत ७ ते ८ वर्षांचा काळ सोडला तर कॉंग्रेसच सत्तेत आहे. परराष्ट्र धोरणांच्याबाबतीत या सत्ता कालावधीत भारताची भूमिका, कार्य व प्रयत्न निराशाजनक आहेत. १९६२ च्या युद्धात...23 September 2011 / No Comment / Read More »
Author : AMAR PURANIKtweet
दरिद्रयाच्या खाईत रुततोय देश•अमर पुराणिकजगातील कोणताही देश ठाम धोरणे, देशाच्या प्रगतीप्रती तीव्र आस्था व वर्षानुवर्षे अखंड प्रयत्न केल्याशिवाय मोठा होत नसतो. सर्व मोठी राष्ट्रे ही अशाच अथक व प्रामाणिक प्रयत्नातूनच मोठी झाल्याचे दिसून येते. भारताला नैसर्गिक व ऐतिहासिक देणगी असतानाही गेल्या काही काळापासून भारत दिवसेंदिवस मागे पडतोय याची कारणे काय असावीत? अर्थात याला अनेक कारणे आहेत. यातील महत्त्वाचे कारण म्हणजे, धोरणी नेतृत्वाचा अभाव हे महत्वाचे कारण आहे. तसेच प्रगतीचा ध्यास असणारे, भ्रष्टाचार विरहीत राजकीय पक्ष लाभणे हेही तितकेच...23 September 2011 / No Comment / Read More »